Friday, September 4, 2020

Police Commissioner of Navi Mumbai visited at Covid Care center 'Nivara' at Kalamboli, Navi Mumbai

Today Mr. Bipin Kumar Singh sir, Police Commissioner of Navi Mumbai visited at Covid Care center 'Nivara' at Kalamboli where all the corona infected polices are admitted, where he inquired about the health of admitted Police staff.
आज नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री बिपिन कुमार सिंह सर यांनी कोविड केअर सेंटर, कळंबोली 'निवारा' येथे भेट दिली जिथे कोरोना संक्रमित सर्व पोलिसांना दाखल केले जाते. सरांनी दाखल पोलिसांची आरोग्यविषयक विचारपूस केली.

Thursday, September 3, 2020

Mr. Bipin Kumar Singh has taken a charge of Navi Mumbai Police Commissioner from Mr. Sanjay Kumar.






श्री. बिपिन कुमार सिंह यांनी श्री. संजय कुमार यांचे कडून नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला.
Mr. Bipin Kumar Singh has taken a charge of Navi Mumbai Police Commissioner from Mr. Sanjay Kumar.

Tuesday, September 1, 2020

Charge D’Affaires of UAE in Mumbai meets Governor

 Charge D’Affaires of UAE in Mumbai meets Governor


 Saud Abdelaziz Alzarooni, Charge D’Affaires of the Consulate General of the United Arab Emirates in Mumbai called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Monday (31st Aug).

            Stating that the relations between India and the United Arab Emirates date back to several years, Mr Saud Abdelaziz called for further strengthening the relations between the two great countries.

            Recalling that Prime Minister Narendra Modi had opened a big temple in Abu Dhabi, he said UAE is the most peaceful and progressive nation in the Gulf region which respects the religion and culture of all people.

            Mentioning that a large number of people from UAE visit India for medical treatment, tourism, business and family relations, he said these visits will resume once all restrictions on the movement of people placed due to the Coronavirus pandemic are eased.  He expressed the confidence that India will overcome the Covid -19 challenge on its own because of its superior doctors and healthcare infrastructure.

            Governor Koshyari said the relations between India and the UAE have historic contexts. He said the people of the two countries are bound by the common elements of culture, food and traditions. The Governor called for further strengthening the relations between India and the UAE.

Friday, August 28, 2020

*शिवछाया मित्र मंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा . . . !!*

 *शिवछाया मित्र मंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा . . . !!*



       या वर्षी शिवछाया मित्रमंडळाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा असल्याने साहजिकच या वर्षी या माध्यमातून आगळावेगळा देखावा आणि काहीतरी वेगळं विचारधन मिळेल ही भावना व उत्सुकताही गणेश भक्तांच्या मनात होती. मात्र यावर्षी कोरोनाचं वैश्विक  संकट लक्षात घेता, शासकीय नियमांच्या अधीन राहून  या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा आम्ही अगदी  नाईलाजास्तव साधेपणाने साजरा केलेला आहे.
         हा उत्सव साजरा करताना यावर्षी आम्ही  पर्यावरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन *झाडे लावा - झाडे जगवा* हा छोटेखानी देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात  झाडे व फुलांची सजावट करण्यात आली होती.  "नवी मुंबईचा राजा" म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणेशोत्सवादरम्यान सर्व मंडप तसेच आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला होता.  मंडपांच्या प्रथमदर्शनी सॅनिटायझर स्टॅंड ठेवण्यात आले होते. तसेच ऑक्सिमीटर ने प्रत्येक भाविकांची तपासणी करण्यात आली होती.मास्क घालूनच दर्शन देण्यात आले. दरवर्षी नऊ फुटाच्या मूर्तीची स्थापना करत असताना या वर्षी मात्र फक्त एकवीस इंच (२१) उंचीची शाडूमातीच्या  मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
यावर्षी कोरोनाचं संकट लक्षात घेता मंडळाने कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याच वर्गणीतून यावर्षी उत्सव साधेपणाने करीत असताना मागील शिल्लक राशीचा वापर  कोरोना संकटाशी लढण्यासाठी, 

मुख्यमंत्री सहायता निधीस १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. 

तसेच परराज्यातील कामगार, नागरिक या ठिकाणी अडकून पडले होते. अशा तुर्भे, वाशी परिसरातील ८०० नागरिकांना रोज दुपारचे जेवण सतत ४० दिवस पुरवण्यात आले. 

तसेच गरीब व गरजूंना अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.तसेच मुंबई विद्यापीठ कॅम्पस, गरवारे कॅन्टीन येथे शासनामार्फत कम्युनिटी किचन हा गरीब व गरजू लोकांना भोजनाची  व्यवस्था व्हावी  म्हणून एक चांगला उपक्रम सुरू  केलेला होता.  त्यासाठी मंडळाने पाचशे किलो अन्नधान्याची (तांदूळ, तुरडाळ, कांदे, बटाटे, टोमॅटो आणि भाजपाला)  वस्तुरूपाने मदत दिली.
 
वाडा येथील आदिवासी कुटुंबातील पाच विद्यार्थ्यांना बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली.

आई वडील हयात नसलेल्या कुमारी योगेश्वरी भाऊ चामणर हिला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे वादळात  नुकसान झालेल्या  कुटुंबियांना मंडळाकडून आर्थिक मदत देण्यात देण्यात आली.

यावर्षी कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे भव्यदिव्य आरास, देखावा जरी आम्हाला साजरा करता आला नसला तरीही सामाजिक जाणिवेत मात्र आमचे मंडळ कुठेही कमी पडले नाही. *कारण आम्ही जपतो सामाजिक बांधिलकी...*

                   अंकुश वैती      
                         अध्यक्ष
          शिवछाया मित्र मंडळ                                          
                  तुर्भे, नवी मुंबई 


सेक्रेटरी  : अशोक पाटील







Thursday, August 27, 2020

मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांच्याकडून महापालिकेच्या सफाई कामगारांना मोफत 'मनसे हेल्थ लॅब कार्ड' वाटप



नवी मुंबई - *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे* यांच्याकडून विभागातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महापालिकेच्या सफाई कामगारांना *शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२० रोजी* मोफत 'मनसे हेल्थ लॅब कार्ड' चे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात रक्त तपासणी तसेच इतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मोठा खर्च येत आहे. त्यातच संचारबंदीमुळे सफाई कामगारांचे आर्थिक बजेट सुद्धा कोलमडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे पी.आर.एस.लॅबमध्ये सफाई कामगारांना रक्त तसेच इतर वैद्यकीय तपासणी करण्यासाठी *५० % सवलत* मिळावी यासाठी मोफत 'मनसे हेल्थ लॅब कार्ड' वाटप करण्यात आले. 'मनसे' तर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा शेकडो सफाई कामगारांनी लाभ घेतला. *सफाई कामगारांच्या परिश्रमामुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महानगरपालिकेला देशातून तिसरे आणि महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाचे मानांकन मिळाल्या बद्दल सफाई कामगारांचे मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी यावेळी अभिनंदन केले.* यावेळी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अविनाश यादव, सुपर वायजर ज्ञानेश्वर पाटील, सुपर वायजर भगवान हिवाळे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे नवी मुंबई उपचिटणीस दिनेश काकडे, महाराष्ट्र सैनिक वैभव जिमन, महाराष्ट्र सैनिक प्रणिल गडेकर हे उपस्थित होते.

इंटकच्या पाठपुराव्यामुळे पालिका कामगारांची वेतनवाढ

 इंटकच्या पाठपुराव्यामुळे पालिका कामगारांची वेतनवाढ




महापालिका प्रशासनात आरोग्य विभागात काम करणार्‍या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम)  काम करणारे डाटा एंण्ट्री ऑपरेटर, सहाय्यक परिचारिका (एएनएम), वाहनचालक, औषध निर्माता, स्टाफ नर्स या सर्वाच्या वेतनात पालिका प्रशासनाने वेतनवाढ मिळाली आहेे. या कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ व्हावी, समान कामाला समान वेतन हा निकष लावावा या मागणीसाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत हेे गेेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करत होेते. इंटकच्या पाठपुराव्यामुळे वेतनवाढ झाल्याची प्रतिक्रिया संबंधित कर्मचार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहेे.
संबंधित कामगारांच्या वेतनवाढ यासह अन्य समस्यांबबाबत नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी विधानसभा  अध्यक्ष नाना पटोळेे यांच्याकडेही पाठपुरावा  केला होता. या पाठपुराव्याची दखल   घेत नाना पटोळे यांनी त्यांच्या दालनात महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पालिका अधिकारी व कामगार संघटना यांच्यामध्ये बैठक घडवून आणतानना संबंधित कामगारांना लवकरात लवकर न्याय देण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला  दिलेे होेते. स्वत: विधानसभा अध्यक्ष नाना पटोळे नवी मुंबईतील कामगार समस्या सोडविण्यात पुढाकार घेत असल्याचे पाहून पालिका प्रशासनाने कामगारांच्या वेतनवाढीच्या प्रक्रियेला गती दिली असल्याची माहिती रवींद्र सावंत यांनी दिली.
या कामगारांना अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत पालिका प्रशासनाकडून कमी वेतन मिळत आहेे. तेथील महापालिका प्रशासनात काम करणार्‍यांना मिळणारे  वेतन व नवी मुंबई महापालिका प्रशासनातील जुन्या अनुभवी कर्मचार्‍यांना कमी वेतन ही वस्तूस्थिती इंटकच्या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी महापालिका प्र्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिली होती. तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याही सतत भेटीगाठी घेत संबंधित कामगारांच्या वेतनवाढीसाठी पाठपुरावा केला होता. मिसाळ यांनी दोन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर संबंधित कामगारांच्या वेतनवाढीच्या एका  फाईलवर सही केल्याची व विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती कामगार नेेते रवींद्र सावंत यांनी दिली. या कामगारांना गेली अनेक वर्षे  अवघ्या 6 ते 7 हजार रूपये मासिक वेतनावर काम करावे लागत होेते.
1 जुलै 2020 पासून या कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यामुळे किमान वेतन 6 ते 7 हजार  रूपयावर काम करणार्‍या कामगारांना आता 20 हजार 213 रूपये वेतन मिळण्यास या महिन्यापासून सुरूवात झाली आहेे. बहूउद्देशीय संवर्गात काम करणार्‍या अर्धकुशल कामगारांना इतकी वर्षे काम केेल्यामुळे त्यांना कुशल कामगार म्हणून पदोन्नती मिळावी म्हणून इंटकच्या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पालिका प्रशासनान  संबंधित कामगारांना कुशल कामगार म्हणून बढती दिल्याची व वेतनवाढ झाल्याची माहिती कामगार वर्गाकडून देण्यात येेत आहेे.  
इंटकच्या पाठपुराव्यामुळे यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाच  आम्हाला पावला असल्याची प्रतिक्रिया पालिका प्रशासनात काम करणार्‍या परिचारिका, डाटा एण्ट्री ऑपरेटर, औषध निर्माता  आदी  संवर्गातील कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहेे.

* पत्रकारांच्या सहकार्यामुळे झाले शक्य
कामगारांच्या प्रश्नाविषयी आम्ही सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो. त्या त्या वेळी नवी मुंबईतील पत्रकारांनीही कामगारांच्या समस्यांना, इंटकच्या पाठपुराव्याला प्रसिध्दी देण्याचे काम केलेे. पत्रकारांच्या सहकार्यामुळेच कामगार वर्गाचे प्र्रश्न सुटण्यास मदत झाली असल्याची प्रतिक्रिया नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिली.

वाशीचे पालिका रुग्णालय १५ सप्टेंबरपासून सर्व उपचारांसाठी खुले होणार


 वाशीचे पालिका रुग्णालय १५ सप्टेंबरपासून सर्व उपचारांसाठी खुले होणार

लोकनेते आ.गणेश नाईक यांची मागणी पूर्ण
नवी मुंबई प्रतिनिधी
वाशीचे प्रथम संदर्भ पालिका रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असल्याने कोरोना व्यतिरिक्त आजारांवरील उपचार बंद होते.  इतर व्याधींच्या रुग्णांना उपचारासाठी एकमेव आधार असलेले हे रुग्णालय सर्व आजारांवरील उपचारासाठी खुले करावे, अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी लावून धरली होती. त्या मागणीवर कार्यवाही होणार असून येत्या १५ सप्टेंबर २०२०नंतर हे रुग्णालय जनरल रुग्णालय म्हणून काम करणार आहे.
नवी मुंबईत कोरोना प्रतिबंधासाठी लोकनेेते आ.नाईक सातत्याने प्रयत्नशील आहेत. पालिका आयुक्तांच्या त्या नियमित भेटी घेत आहेत. या आढावा बैठकांमधून त्यांनी केलेल्या उपयुक्त सुचनांवर पालिकेने सकारात्मक कार्यवाही केली आहे. प्रथम संदर्भ रुग्णालय १५ सप्टेंबरपासून  जनरल रुग्णालय म्हणून काम करण्यास सुरुवात करेल, अशी माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी लोकनेते नाईक यांना सोमवारच्या भेटीत दिली आहे. नेरुळच्या डॉ डि. वाय. पाटील  रुग्णालयाबरोबर पालिकेने करार केला असून या अंतर्गत त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यात २०० आय.सी.सी.यू. बेड व्हेंटिलेटर सुविधेसह उपलब्ध करुन दिले जात आहेत. या नंतर वाशीचे कोविड रुग्णालय नेरुळ येथे हलविण्यात येणार आहे. लोकनेते आ. नाईक यांच्या समवेत आयुक्तांना भेटण्यास गेलेल्या शिष्टमंडळात माजी खासदार डॉ संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर सुधाकर सोनावणे, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी सभापती नेत्रा शिर्के, माजी सभापती डॉ जयाजी नाथ, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती सुरज पाटील, माजी सभापती शंकर मोरे,  माजी सभापती विशाल डोळस आदी मान्यवरांचा समावेश होता. 
लॉकडाउनच्या काळात नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. मुलांचा शैक्षणिक खर्च कसा करायचा? असा गहन प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती लवकरात-लवकर अदा करावी, अशी मागणी लोकनेते नाईक यांनी केली होती. या मागणीवर पालिकेचा शिक्षण विभाग अंतिम टप्प्यावर काम करीत असून लवकरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिवाय राज्य आणि केंद्र शासनाच्या शालेय पोषण आहाराचा लाभही विद्यार्थ्यांना द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी पालिकेकडे केली आहे.
कोविड सेंटरमधून व्हिटॅमिनच्या गोळया नसल्याच्या बातम्या येत असल्याबददल प्रसिध्दी माध्यमांनी विचारले असता ५० हजार गोळयांचा साठा सद्यस्थितीत पालिकेकडे असल्याची माहिती आपल्याला आयुक्त बांगर यांनी दिल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. कोविडसह इतर सर्व पालिका रुग्णालयांमधून औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी सुचना लोकनेते नाईक यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.
कोरोना निर्मुलनासाठी आरोग्यावर प्राधान्याने खर्च करीत असताना शहर विकासाच्या बाबींकडे लक्ष देण्याची सुचना त्यांनी पालिका आयुक्तांना केली. बगिचे, रस्ते, पदपथ, उडडाणपूल, परिवहन बसेस,शाळांच्या इमारती अशा सर्व सेवा आणि वास्तूंच्या देखभालीसाठी पालिकेला खर्च करावा लागणार आहे.  त्यामुळे पालिकेने आपले उत्पन्न, झालेला खर्च, विनियोग न झालेला निधी यांचा समग्र आढावा घेवून खर्चाचे नियोजन करावे, असा सल्ला त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबईने प्राप्त केलेले यश हे जागरुक नवी मुंबईकर, सतर्क लोकप्रतिनिधी, कर्तव्यदक्ष पालिका कर्मचारी-अधिकारी आणि विशेषकरुन प्रत्यक्ष काम करणारे सफाई कर्मचारी तसेच या सर्वांना मार्गदर्शन करणारी प्रसिध्दी माध्यमं यांना असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. स्वच्छ सर्वेक्षणात देशस्तरावर तिसरा क्रमांक नवी मुंबईला मिळाला आहे.पुढच्या वर्षी पाहिले स्थान पटकाविण्याचा प्रयत्न व्हावा,असे आवाहन त्यांनी केले.
अवतरण...
नवी मुंबईत जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण येत नाही तोपर्यंत आम्ही आमचे प्रयत्न सुरुच ठेवणार आहोत. पालिका आयुक्तांबरोबर आढावा बैठका होत राहतील. 
-लोकनेते आ.गणेश नाईक

Wednesday, August 19, 2020

Dr. Sanjay Mukherjee appointed as CIDCO’s new Vice-Chairman and Managing Director

Dr. Sanjay Mukherjee appointed as CIDCO’s new Vice-Chairman and Managing Director
Dr. Sanjay Mukherjee, an IAS officer has been appointed as new Vice-Chairman and Managing Director of CIDCO today on 19 August 2020. Before noon, he accepted the post’s responsibilities from Shri. Lokesh Chandra, former Vice -Chairman and Managing Director at CIDCO’s Nirmal Bhavan office at Mumbai. At that moment CIDCO’s Shri. Ashwin Mudgal, Joint Managing Director, Dr. Prashant Narnavare, Joint Managing Director, Shri. Ashok Shingare, Joint Managing Director and Shri. Nisar Tamboli, Chief Vigilance Officer were also present. Before being appointed at CIDCO, Dr. Sanjay Mukherjee was working as Secretary at Medical Education, Food and Drug Administration and Department of Cultural Affairs, Maharashtra. 
Dr. Sanjay Mukherjee, a 1996 batch IAS officer of Maharashtra cadre belongs from Nagpur. He secured his (Bachelor’s degree in Surgery) MBBS from Nagpur’s Government Medical College, Short-term course on Public Finance from Indian Institute of Management, Ahmedabad, Chartered Financial Analyst in Finance from Institute of Chartered Financial Analyst of India and Degree of Public Administration and Finance from Toronto University. Before appointment at CIDCO, Dr. Sanjay Mukherjee worked as Additional Commissioner (Projects), Mumbai Municipal Corporation, Commissioner at Maharashtra State Excise Department, Joint Managing Director at Maharashtra Airport Development Company, Commissioner at Jalgaon Municipal Corporation and Additional Commissioner at Nagpur Municipal Corporation.

Monday, August 10, 2020

सोसायटी, वसाहतीपर्यंत मोबाईल अँटीजेन टेस्ट व्हॅन सेवा देणा-या व जनजागृती करणा-या "मिशन झिरो नवी मुंबई" उपक्रमास पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ

सोसायटी, वसाहतीपर्यंत मोबाईल अँटीजेन टेस्ट व्हॅन सेवा देणा-या व जनजागृती करणा-या

 "मिशन झिरो नवी मुंबई" उपक्रमास पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ

 

      कोरोनाबाधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन कोरोनाची साखळी खंडित करण्यावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर दिला जात असून याकरीता भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सोसायटी, वसाहतींमध्ये जाऊन नागरिकांच्या घरापर्यंत मोबाईल व्हॅनव्दारे अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा एक चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी  समाधान व्यक्त करीत यामधून मृत्युदर कमी करण्याचे उद्दीष्ट साध्य होईल अशी खात्री वाटते असे सांगितले.

      भारतीय जैन संघटनेच्या वतीने 'मिशन झिरो नवी मुंबई' या उपक्रमाची सुरुवात ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, खासदार श्री. राजन विचारे यांच्या सन्माननीय उपस्थितीत, वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या आवारात करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, शासनाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती श्री. विजय नाहटा, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री धर्मेशभाई जैन, विजय लखानी, राहुल नाहटा, राजुल व्होरा, शिल्पिन तातर, डॉ. विवेकानंद सावंत व इतर महापालिका अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेण्यात आले असून त्याव्दारे लवकरात लवकर रुग्ण शोध आणि त्याचे विलगीकरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेने अर्ध्या तासात तपासणी अहवाल प्राप्त होणाऱ्या अँटीजेन टेस्टींगवर भर दिला असून 22 अँटीजेन टेस्टींग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यामुळे रुग्ण शोध मोहिमेला गती प्राप्त्‍ा झाली आहे.

      तरीही अनेक नागरिक अँटीजेन टेस्टींग केंद्रांपर्यंत येऊन टेस्ट करत नसल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'अँटीजेन टेस्ट आपल्या घरापर्यंत' ही संकल्पना नजरेसमोर ठेवून सोसायटी, वसाहतींपर्यंत अँटीजेन टेस्ट करण्यासाठी 'मोबाईल अँटिजेन टेस्ट व्हॅन' सुरु करण्याचे ठरविले. आयुक्तांच्या या संकल्पनेला भारतीय जैन संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या माध्यमातून कोव्हीड-19 प्रतिबंधाचा प्रचार व अँटीजेन टेस्टींग सेवा देण्यासाठी नियोजन करण्यात आले. या उपक्रमास युनायटेड वे, क्रेडाई एम.सी.एच.आय., देश अपनायें या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

      या उपक्रमांतर्गत 6 प्रचाररथ तयार करण्यात आले असून त्यावर जिंगल्स, संवाद, निवेदन या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या सोसायटी, वसाहतीमध्ये अँटीजेन टेस्टींग करण्यात येणार आहे त्याठिकाणी आधीच्या दिवशी जाऊन दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या अँटीजेन टेस्टींग बाबत माहिती दिली जाणार आहे व तेथील नागरिकांची मानसिकता तयार केली जाणार आहे.

      यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, किडनीचे विकार असे आधीपासूनच आजार असणाऱ्या व्यक्तींच्या अँटीजेन टेस्टींगवर भर देण्यात येणार आहे. त्यासोबतच खोकला, ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. याशिवाय ज्या व्यक्ती स्वत:हून अँटीजेन टेस्ट करु इच्छितात त्यांचीही अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. याकरीता एखादया सोसायटी, वसाहतीमार्फत त्यांच्या येथे अँटीजेन टेस्ट करावयाची मागणी झाल्यास त्या ठिकाणीही 'ऑन कॉल अँटीजेन टेस्ट सुविधा' उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी पालकमंत्री महोदयांना दिली.

      कोव्हिड - 19 रुग्णांची लवकरात लवकर माहिती मिळून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी "मिशन झिरो नवी मुंबई" हा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरणार असून नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी घरापर्यंत अँटीजेन टेस्टींग उपलब्ध करुन देणारा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

Friday, July 31, 2020

अपोलो हॉस्पिटल मधील प्लाझमा डोनेशन कॅम्पची पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा


 अपोलो हॉस्पिटलमधील प्लाझमा डोनेशन कॅम्पची पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशंसा

      त्याचप्रमाणे अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित प्लाझमा डोनेशन कॅम्पला भेट देऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. येथे ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अपोलो हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय प्रमुख श्री.संतोष मराठे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

      कोरोनावर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने कोरोनाशी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा अत्यंत महत्वाचा घटक असून प्लाझमा थेरपी एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरताना दिसत आहे. त्यामुळे प्लाझमा डोनेशन कॅम्पच्या माध्ययमातून नवी मुंबई महानगरपालिकेने अपोलो हॉस्पिटलच्या सहयोगाने उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आहे. कोरोनामधून बरे झालेले जे नागरिक प्लाझमा डोनेशनसाठी स्वयंस्फुर्तीने पुढे येत आहेत त्यांचे कौतुक करीत ना. श्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी प्लाझमा डोनेशन करणाऱ्या नागरिकांना मंत्रीमहोदयांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

नेरूळ रूग्णालयातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड -19 लॅबचीपालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी


      नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोव्हीड - 19 चाचणी व निदान (Rt-PCR Fully Automatic Lab) प्रयोगशाळेच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. श्री एकनाथ शिंदे यांनी केली. दररोज 1 हजार कोव्हीड 19 चाचण्या होणारी महानगरपालिकेची स्वतःची लॅब नवी मुंबईकर नागरिकांसाठी उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या लॅबव्दारे २४ तासाच्या आत रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने लवकर निदान होऊन कोव्हीड 19 चा प्रसार रोखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

‌        महापालिका आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी पालकमंत्री महोदयांना लॅबच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री महोदयांनी लॅबमधील उपकरणांची व त्यांच्या कार्यप्रणालीची प्रक्रिया बारकाईने जाणून घेतली व मौलिक सूचना केल्या. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री विजय नाहटा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांचेकडून नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड 19 स्थितीचा आढावा

नवी मुंबईतील कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांनी आज महापालिका मुख्यालयास भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महापालिका क्षेत्रातील कोव्हीड सद्यस्थितीची सादरीकरणाव्दारे माहिती देत कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या विविध कामांची व आगामी नियोजनाची माहिती मंत्री महोदयांना दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री. संजय काकडे आणि इतर महापालिका विभागप्रमुख उपस्थित होते.

      कोव्हीड 19 चाचण्यांसाठी काही दिवसातच नवी मुंबई महानगरपालिका स्वत:ची आरटीसीपीआर लॅब सुरू करीत असल्याबद्दल तसेच शहरातील बेड्सची संख्या रिअल टाईम नागरिकांना समजण्यासाठी ऑनलाईन लाईव्ह डॅशबोर्ड कार्यान्वित करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत गृहराज्यमंत्री ना.श्री.सतेज पाटील यांनी शहरातील व्हेंटिलेटर्स बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा असे सूचित केले. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस, ब्लडप्रेशर असे इतर आजार असणा-या व्यक्तींकडे अधिक लक्ष द्यावे असे त्यांनी सूचित केले. ए.पी.एम.सी. मार्केट बंद करणे शक्य नाही मात्र त्याठिकाणी येणा-या प्रत्येक नागरिकाची स्क्रिनींग व्हावी याकरिता विशेष उपाययोजना करणेबाबत त्यांनी निर्देशित केले.

      रूग्णशोध व तपासणी वाढविण्यासोबतच मृत्यू दर कमी करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे उद्दिष्ट आयुक्तांनी नजरेसमोर ठेवले असून शहरातील रुग्णालयांशी संपर्क साधून नागरिकांना आवश्यक सेवा शासनाने निश्चित केलेल्या दरांतच मिळतील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेतून जास्तीत जास्त नागरिकांना उपचार मिळावेत असे त्यांनी सूचित केले.. त्याचप्रमाणे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना नियमित मास्क वापरण्याचे तसेच बाहेर वावरताना एकमेकांमध्ये सुयोग्य अंतर ठेवण्याचे आवाहन गृहराज्यमंत्री ना.श्री. सतेज पाटील यांनी केले.

अनलॉककाळात महिला नोकरदारांना नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यासाठी विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करणेबाबत आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नवी मुंबई:- कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असताना याचा सर्वाधिक फटका महिला नोकरदार वर्गाला झाला आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेले 4 महिने कार्यालये बंद असल्याने सक्तीच्या रजेवर असलेल्या नोकरदार महिलांना नवी मुंबई ते मुंबई अशा प्रवासाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची होणारी वाताहत पाहता नवी मुंबई ते मुंबई ये-जा प्रवास करण्याकरिता विशेष बस व रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांजकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोना महामारीने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेली महिने नवी मुंबईसह मुंबईतील नोकरदार महिला या विनावेतन रजेवर होत्या. सद्यस्थितीत अनलॉक सुरू झाल्यानंतर नवी मुंबई मधून मुंबईकडे किंवा मुंबईमधून नवी मुंबईकडे नोकऱ्यांसाठी महिलांचा प्रवास अनियमित होत असतो. परंतु सध्याच्या नियमावलीप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांना बस,ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी हेच पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी मध्यमवर्गीय नोकरदार महिलांना ऑटो किंवा टॅक्सी हा पर्याय परवडणारा नसल्याने शेवटी बस हाच एक पर्याय या महिलांसाठी आहे. परंतु कोविडची नियमावली पाहता बसमधून प्रत्येक सीटवर एक प्रवासी व उभे पाच प्रवासी अशा पद्धतीने प्रवास करता येऊ शकतो परंतु बस डेपोमधून बसेस या नेहमी भरून येत असल्याने उर्वरित बस स्टॉपवरील महिलांना बस मिळण्यासाठी साधारण दीड ते दोन तास वाट बघावी लागत आहे. एकूण बस थांबे पाहता कोणत्याही बस थांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाहीअशावेळी महिलांना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागते. दुसरीकडे लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. नोकरदार महिलांना प्रवासाची होणारी वाताहत पाहता विशेष बस किंवा रेल्वेची सुविधा उपलब्ध करण्याबाबत एक महिला आमदार म्हणून अनेक महिलांची सातत्याने माझ्याकडे मागणी होत आहे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांजकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 


Thursday, July 30, 2020

दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग, एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात

दररोज होत आहे 2000 हून अधिक नागरिकांची कोव्हीड 19 टेस्टींग


 

आजमितीस 18 ठिकाणी अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू असून दररोज साधारणत: 1300 हून अधिक व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. तसेच अँटिजेन आणि आर.टी.-पी.सी.आर. मिळून 2000 हून अधिक व्यक्तींच्या कोव्हीड 19 टेस्ट करण्यात येत आहेत.

16 जुलै पासून 27 जुलैपर्यंत 7950 व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यामध्ये 1570 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तथापि अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला आणि त्या व्यक्तीमध्ये कोव्हीड 19 सदृष्य लक्षणे आढळत असतील तर त्या व्यक्तीची लगेच आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट महापालिकेच्या वतीने मोफत करून घेण्यात येत आहे. तसेच पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 20 पेक्षा अधिक व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही आरोग्य तपासणी करण्यात येते.

  एपीएमसी मार्केटमध्ये अँटिजेन टेस्ट सेंटरला सुरूवात

 

तुर्भे येथील ए.पी.एम.सी. च्या 5 मार्केटमध्ये संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातून जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दररोज हजारो नागरिक विविध ठिकाणाहून येत असल्याने तेथील कोरोना प्रसार नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या ए.पी.एम.सी. प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी जाहीर केल्याप्रमाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 27 जुलैपासून विशेष रॅपिड अँटिजेन टेस्ट सेंटर सुरू करण्यात आले आहे.


कोरोना सदृष्य लक्षणे जाणवल्यास अँटिजेन टेस्ट सेंटरमध्ये विनामूल्य टेस्ट करून घेण्याचे आवाहन

कोरोना सदृष्य लक्षणे जाणवल्यास अँटिजेन टेस्ट सेंटरमध्ये विनामूल्य टेस्ट करून घेण्याचे आवाहन

'मिशन ब्रेक द चेन' प्रभावीपणे राबविताना मृत्यू दर कमी करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यादृष्टीने ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग, किडनीचे विकार असे आधीपासूनच आजार असणा-या व्यक्तींची जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. याकरिता सर्वेक्षण करताना अशा व्यक्तींची वेगळी नोंद करणे व त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी सर्व आरोग्य अधिकारी यांना दिलेले आहेत. 

महत्वाचे म्हणजे कोणत्याही नागरिकाला ताप, सर्दी, घशात खवखव, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास ती न लपवता महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्र अथवा 5 रूग्णालयांतील फ्ल्यू क्लिनीकमध्ये जाऊन तात्काळ तपासणी करून घ्यावी व रॅपीड अँटिजेन टेस्ट मोफत करून घ्यावी असे आवाहन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.

कोव्हीड 19 टेस्टींग संख्येत वाढ करून लवकर रूग्णशोध व विलगीकरणातून कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा भर

कोव्हीड 19 टेस्टींग संख्येत वाढ करून लवकर रूग्णशोध व विलगीकरणातून कोरोनाची साखळी

खंडीत करण्यावर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा भर

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना नियंत्रणासाठी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी 'मिशन ब्रेक द चेन' ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. याव्दारे लवकरात लवकर रूग्णशोध करून त्यांचे त्वरित विलगीकरण करण्यावर भर दिला जात असल्याने या कोरोना बाधितांच्या माध्यमातून संसर्गातून पसरणारी कोरोनाची साखळी खंडीत करण्यावर भर दिला जात आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात 31 जुलैपर्यंत हॉटस्पॉट क्षेत्रे म्हणून लॉकडाऊन घोषित केलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जात आहे व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या व्यक्तींची लगेच ॲटिजेन टेस्ट करण्यात येत आहे.

रॅपीड अँटिजेन टेस्टींगव्दारे केवळ अर्ध्या तासाच्या आत तपासणी अहवाल प्राप्त होत असल्याने व त्यामधून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती त्वरित समजत असल्याने अँटिजेन टेस्ट सेंटर वाढविण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे.  16 जुलै रोजी सेक्टर 10 वाशी येथील महापालिकेच्या सार्वजनिक डेडिकेटेड कोव्हीड रूग्णालय येथून रॅपीड अँटिजेन टेस्टला प्रारंभ करण्यात आला असून या टेस्ट सेंटरच्या संख्येत दररोज वाढ होईल याकडे आयुक्तांचे कटाक्षाने लक्ष आहे.


वाढीव विज बिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक

वाढीव विज बिलांच्या विरोधात मनसेची महावितरण कार्यालयावर धडक
नवी मुंबई - वाढीव वीज बिलांविरोधात नवी मुंबईत मनसेने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या नेरुळ येथील कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. यावेळी पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना महावितरणच्या प्रवेद्वारावर रोखले. यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वावर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना बोलावण्यात आले. महावितरण कंपनी कडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत मनसेने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. ग्राहकांना सुधारित विज बिले पाठवून त्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी तसेच ग्राहकांचा विज पुरवठा कोणत्याही प्रकारे खंडित करू नये अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली. अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयाची विज कापण्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी दिला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण तसेच ग्राहकांचा वीज पुरवठा खंडी करणार नसल्याचे आश्वासन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला यावेळी दिले. यावेळी उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन खानविलकर, शहर सहसचिव अभिजित देसाई, शहर सहसचिव दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, विभाग अध्यक्ष विनोद पाखरे, विभाग अध्यक्ष देवा प्रसाद, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, विभाग अध्यक्ष नितीन नाईकडे, रोजगार स्वयं रोजगारचे उपशहर संघटक अनिकेत पाटील हे उपस्थित होते.

Central Railway’s Apta – Filmmakers most preferred film shooting location after CSMT station

Apta Railway Station over Central Railway, continues to be the most popular film shooting location for film makers after Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Railway Station. In the financial year 2019-2020, four films were shot at Apta Railway station including Raat Akeli Hai, Mumbai Saga and Shubh Mangal Zayada Savdhan and 8 films were shot at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, the most popular films were Panga, Choked and Suraj se Mangal Bhari. Apta station is encompassed in camera in numerous films, including the most popular films like Dilwale Dulaniya Le Jayenge, Kuch Kuch Hota Hai, Rang de Basanti, Baaghi, Khaki, Shaadi No. 1, ChinaTown and many other box-office hit films. Shri Shivaji Sutar, Chief Public Relations Officer said “Apta known for his scenic location with one side hill, the other side a road nearby a river and easy road accessibility, located on the Panvel –Roha route with curvy track and platforms, ample space for keeping equipments and to park Vanity Vans of Actors. Such a station with less crowd is a perfect location for film shooting.” Apta Railway station has been given halt for few trains and it is crossing station as such it also has an additional track which makes doubly sweet for movement of special trains booked for film shooting. Apta is just a 2 hours journey, about 75 kms from the Film City, Mumbai. Thereby, Apta Railway Station has become the most preferred location for film shooting of web series, documentaries and TV serials.” Central Railway has been gifted with many beautiful film shooting locations fulfilling the requirements of the film makers. From the most preferred film shooting location, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus to the popular stations like Apta, Panvel, Chouk, Lonavala, Khandala, Wathar, Satara and railway yards like Turbhe and Wadi bunder. The permission for the film shooting is granted by the Public Relations Department of Central Railway, recently to expedite the film shooting permission, a single window system has been introduced, this simplification of the procedure will enable the film companies to obtain permission after submission of the necessary documents along with the script and application mentioning the requirements. Central Railway earned Rs. 1.33 cores in 21 film shootings in 2019-20, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Station with 8 film shootings including film ‘Panga’ earned Rs. 44.52 lakhs, Apta with 22.61 lakh rupees in 4 film shootings. The highest amount of Rs. 22.10 lakhs was earned from Rajnikant starrer ‘Darbaar’ shot at Panvel Station. The scenic location Wathar over Pune Division earned Rs. 37.22 lakhs from 3 films including Salman starrer ‘Dabangg 3’ giving earning of Rs. 15.70 lakhs, a shot of film ‘Lal Singh Chaddha’ between Pune to Mumbai and other film shooting locations like Turbhe and Wadi bunder Yard, Pune station were also generated good income. Though the movement is restricted to contain the spread of COVID19, Central Railway is hopeful that the beauty of Apta and other such locations will be unearthed again in the near future. Let us fight together #COVID19. infomed by the Public Relations Department, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai




Wednesday, July 29, 2020

महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेस 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स प्रदान


नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सुविधेमध्ये लक्षणीय भर घातल्याबद्दल आयुक्तांनी मानले आभार

 

  

       कोव्हीड 19 विरोधातील लढ्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच कोरोना बाधितांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या नियंत्रणाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे. आरोग्य सुविधांमध्ये जाणवणारी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्र शासनाने खंबीरपणे मदतीचा हात देत  एन.आयव्ही., ॲडव्हान्स मोडचे मॉनिटरसह सर्व सुविधा असणारे 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान केले आहेत.

      वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथील नवी मुंबई महानगरपालिकेने उभारणी केलेल्या कोव्हीड केअर सेंटर व डोडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्यापूर्वी अंतिम पाहणीप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री ना.श्री.राजेश टोपे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेस व्हेंटिलेटर्स पुरविण्यात येतील असे आश्वासित केले होते. त्याची पूर्तता पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न करीत प्राधान्याने नवी मुंबई महानगरपालिकेस 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देत केली आहे. याबाबतच्या कार्यवाहीमध्ये ठाणे जिल्हा आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

      महाराष्ट्र शासनामार्फत प्राप्त या 10 अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे अधिक सक्षमीकरण झाले असून नवी मुंबईकर नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असल्याने आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.


Maharashtra board SSC result 2020 details

Thursday, July 23, 2020

गणेशोत्सव व नवरात्रौत्सव - 2020 साजरा करणेबाबत जाहीर आवाहन

2020 मधील गणेशोत्सव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 या कालावधीत तसेच नवरात्रौत्सव 17 ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत साजरा होत असून यावर्षी कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणेकरीता शासनाच्या गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) यांचे दि. 11 जुलै 2020 रोजीच्या परिपत्रकानुसार मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

१.      सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार गणेशोत्सवासाठी यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.

२.      कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमीत केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबधीत स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

३.      श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी.

४.      यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीं ऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मुर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरुन आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत:चे व कुटूंबियांचे साथीच्या रोगापासून रक्षण होईल.

५.      उत्सवाकरीता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

६.      सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

७.      आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

८.      श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

९.      गणेशोत्सव मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क,सॅनिटायझर इ.) पालन करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

१०.  श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन, विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ  नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

११.  महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.


 

---- 2 ----

 

१२.  कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकिय शिक्षण विभाग तसेच संबधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करण्यात यावे.

 

     नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेने विकसित केलेल्या “इ-सेवा संगणक प्रणाली” व्दारे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

     सर्व गणेशोत्सव/नवरात्रौत्सवमंडळे व नागरिकयांनी नवी मुंबई महापालिकेच्या www.rtsnmmconline.comया Website वर गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज करण्यास दि. 25 जुलै 2020 पासून कार्यालयीन वेळेमध्ये ऑनलाईन सेवा सुरु करण्यात येत आहे. तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच Website वर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाईन प्रणालीव्दारे दोन्ही उत्सवाच्या 10 दिवस अगोदर परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी.   

     गणेशोत्सव व नवरात्रौत्सव या करीता सर्व संबधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करण्यात येऊ नयेतसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरण्यात येऊ नये. रितसर परवानगी शिवाय मंडपाची उभारणी सुरु करु नयेमहानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपांवर निष्कासनाची कार्यवाही केली जाईलसर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ व नागरीकांनी याची दक्षता घ्यावयाची आहे.

     मंडप उभारणी परवानगी अर्ज नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे www.rtsnmmconline.com या Website वर ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नयेविशेष करुन गणेशोत्सव नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळानी याची नोंद घ्यावी. उत्सव सुरु होण्याच्या 10 दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी दिली जाणार नाही.

     या संदर्भात माउच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी व याबाबत सविस्तर माहिती देणेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या ८ विभाग कार्यालयांमध्ये संबधीत सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत दि. 25 जुलै 2020 रोजी, सकाळी 11.00 वाजता, आठही ठिकाणी विभाग स्तरावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

या बैठकीसाठी सर्व विभाग कार्यालयांच्या ठिकाणी त्या क्षेत्रातील स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस निरीक्षक, अग्निशमन अधिकारी यांनी उपस्थित रहावयाचे आहे.                                                  तरी याव्दारे सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करणा-या मंडळातील मुख्य पदाधिकारी यांनी शनिवार, दि. 25 जुलै 2020 रोजी, सकाळी 11.00 वा. आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित विभाग कार्यालयामध्ये कोव्हीड 19 च्या सुरक्षा नियमावलीचे पालन करून, सोशल डिस्टन्सींगचे भान राखत, या बैठकीस उपस्थित राहून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Tuesday, June 30, 2020

विशेष प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आज 30 जूनला 7800 घरांतील 25 हजारहून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या भागांमध्ये जास्त संख्येने कोरोना बाधित सापडले आहेत अशा  मोठ्या भागांमध्ये 29 जून ते 5 जुलै या काळात (दिवाळेगाव, करावेगाव, तुर्भे स्टोअर, सेक्टर 21 तुर्भे, सेक्टर 22 तुर्भेगाव, सेक्टर 11 जुहूगाव वाशी, सेक्टर 12 खैरणे-बोनकोडेगांव, सेक्टर 19 कोपरखैरणेगांव, राबाडेगांव, चिंचपाडा ऐरोली) तसेच दि. 30 जून ते 6 जुलै या काळात 2 भागांमध्ये (सेक्टर 1 ते 9 सीबीडी बेलापूर व वाशीगांव) विशेष प्रतिबंधित क्षेत्रे (Special Containment Zone) घोषित करून लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे.

      या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाची साखळी खंडीत होण्याकरिता प्रभावी उपाययोजना राबवित घरोघरी जाऊन मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले असून महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तुर्भे स्टोअर व कोपरखैरणे गाव या दोन विशेष प्रतिबंधात्मक क्षेत्रात 29 जून रोजी भेट देऊन मास स्क्रिनींगच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

      या 12 विशेष प्रतिबंधात्मक क्षेत्रांपैकी 29 जून रोजी 6 क्षेत्रांमधील मास स्क्रिनींगमध्ये 3463 घरांचे मास स्क्रिनींग करण्यात आले असून आज 30 जून रोजी 10 क्षेत्रांमध्ये 7796 घरांमधील 25503 व्यक्तींचे मास स्क्रिनींग करण्यात आले आहे.

 या मास स्क्रिनींगमध्ये जे कोव्हीड 19 संशयित सापडतील त्यांचे लगेच स्वॅब टेस्टिंग करुन संस्थात्मक विलगीकरण (Isolation) करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, कर्करोग, किडनीचे विकार अशा प्रकारे इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्तींची वेगळी नोंद स्क्रिनींग दरम्यान केली जात आहे.

      या मास स्क्रिनींगमधून कोरोना संशयित सापडून त्यांचे विलगीकरण करणे शक्य होईल व त्यांच्यामुळे त्यांच्या निकटवर्तींयांना लागण होण्याचा संभाव्य धोका टळेल असा विश्वास व्यक्त करीत नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करून कोरोनाची साखळी खंडीत करावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले आहे. 



Friday, June 26, 2020

नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल

नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल

 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला करोनायुद्धाचा आढावा

 

·       मास स्क्रीनिंग, काँटॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याचे निर्देश

·       ऑक्सिजन, नॉन ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना

·       जनरल प्रॅक्टिशनर्सना दवाखाने सुरू करण्याचे आवाहन

 

नवी मुंबई  नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांच्या उपचारांत हयगय होऊ नये, यासाठी ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेड्सची संख्या वाढवण्याचे निर्देश देतानाच कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिले. स्क्रीनिंगमुळे संभाव्य करोनाबाधित रुग्ण सुरुवातीच्याच टप्प्यात सापडून त्याचे जलद विलगीकरण करून करोनाची साखळी तोडणे शक्य होत असल्यामुळे स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवतानाच महापालिकेची टेस्टिंग लॅब सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, नवी मुंबईत लवकरच २०० आयसीयू बेड्स रुग्णसेवेत दाखल होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

जूनच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करण्यात आल्यानंतर करोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होत असल्याची गंभीर दखल घेत पालकमंत्री श्री. शिंदे यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील पालिका आणि पोलिस प्रशासनासमवेत आढाव बैठक घेतली. लॉकडाउनमधून काही प्रमाणात मोकळीक दिली असली तरी ज्या भागांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त आहे, अशा कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. मास स्क्रीनिंग आणि काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर देतानाच तपासण्यांचे प्रमाण वाढवण्याची सूचनाही त्यांनी केली. नवी मुंबईत जास्त रुग्णसंख्या असलेले भाग हॉटस्पॉट म्हणून निश्चित करून तिथे २९ तारखेपासून लॉकडाऊनची कठोर अमलबजावणी करण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी या बैठकीत दिले.

या बैठकीला खासदार राजन विचारे, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेली रेमडेसिवीर व अन्य औषधे मागवण्याचे निर्देशही श्री. शिंदे यांनी यावेळी महापालिकेला दिले. यामुळे गरीब गरजू रुग्णांना ही औषधे उपलब्ध होतील, असे श्री. शिंदे म्हणाले.

करोनाविरोधातील लढाईत आपण महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. गेल्या तीन-सव्वा तीन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे आपण हजारो लोकांना करोनाची बाधा होण्यापासून वाचवले. तसेच, अनेकांचे प्राणही वाचवण्यात आपल्याला यश आले. करोनाविरोधातील लढाईत आपण आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात सैल करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने त्यात आणखी शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला अधिक सतर्कपणे या लढाईला सामोरे जावे लागेल, असे सांगून यात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही श्री. शिंदे यांनी दिला. जनरल प्रॅक्टिशनर्सनी आपले दवाखाने सुरू ठेवून प्रशासनाला या युद्धात मदत करावी, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले.

Sunday, June 21, 2020

वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांसाठी खास लिंक उपलब्ध करून दिलेली आहे.

दि.२१ जून २०२० : लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी केलेल्या वीजवापराचे प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे महिन्यासह जूनचे देण्यात आलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल स्लॅब बेनिफीटसह योग्य व अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकाराचा अतिरिक्त भुर्दंड लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमिवर वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयांत गर्दी करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 
दरम्यान, दोन ते तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलाची माहिती घेण्यासाठी तसेच स्लॅब बेनिफिट, भरलेल्या रकमेचे समायोजन, मासिक वीजवापर व स्लॅबप्रमाणे लावलेला वीजदर आदींची संपूर्ण पडताळणी करण्यासाठी महावितरणने वीजग्राहकांसाठी खास https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ ही लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. केवळ ग्राहक क्रमांक देऊन या लिंकद्वारे वीजबिलाचा संपूर्ण हिशोब व महावितरणकडून करण्यात आलेले ग्राहकांना वीजबिलांचे विश्लेषण पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
कोरोना विषाणूमुळे राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. रिडींग बंद झाल्यामुळे राज्यातील लघुदाब ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले तसेच वेबपोर्टल व मोबाईल अॅपद्वारे मीटरचे रिंडीग पाठविण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये २ कोटी ३० लाख ग्राहकांपैकी केवळ २ लाख ६५ हजार वीजग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविले. त्याप्रमाणे त्यांना वीजवापराचे अचूक मासिक वीजबिल देण्यात येत आहे.  
उर्वरित वीजग्राहकांना पाठविण्यात आलेली सरासरी वीजबिले दुरुस्त करण्यासाठी रिडींग घेणे आवश्यक होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर दि. १ जूनपासून स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागात मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर वीजग्राहकांना लॉकडाऊन कालावधीमधील एप्रिल व मेसह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात येत आहे. उदा. ग्राहकांना जूनमध्ये ३.०७ महिन्यांचे ३०७ युनिटचे वीजबिल आले असेल तर एप्रिल, मे व जूनमध्ये प्रत्येकी १०० युनिटचा वीजवापर झाला आहे. मात्र जूनच्या बिलातील ३०७ युनिटला थेट ३०१ ते ५०० युनिटचा स्लॅब दर न लावता तीन महिन्यांच्या प्रत्येकी १०० युनिटला ० ते १०० युनिटचा स्लॅब दर लावण्यात येत आहे. याशिवाय ३१ मार्चपर्यंत वापरलेल्या युनिटची संख्या दर्शवून ३१ मार्च 2020 पूर्वी जे वीजदर लागू होत तेच दर लावण्यात आले आहेत. एवढी अचूकता महावितरणने संगणीकृत प्रणालीमध्ये वापरलेली आहे. 
वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या कालावधीत सरासरी वीजबिलांचा भरणा केला असल्यास जूनमधील तीन महिन्यांच्या एकत्रित वीजबिलामध्ये एप्रिल व मे महिन्यांचा स्थिर आकार व विद्युत शुल्क वगळता उर्वरित रक्कम समायोजित करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना हिवाळ्यातील वीजवापराप्रमाणे सरासरी देयके पाठविण्यात आली होती. मात्र ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमध्ये वाढलेला प्रत्यक्ष वीजवापर व दि. १ एप्रिल २०२० पासून लागू झालेले नवीन वीजदर यामुळे एप्रिल, मे व जून महिन्यांचे मासिक परंतु एकत्रित दिलेले वीजबिल अधिक युनिटचे व रकमेचे असण्याची शक्यता आहे.
एप्रिल, मे व जून महिन्यांचे वीजबिल वीजग्राहकांना एकत्रित परंतु, स्वतंत्र मासिक हिशोबानुसार देण्यात आलेले आहे. हे तीन महिन्यांचे जूनमध्ये देण्यात आलेले वीजबिल अतिशय अचूक आहे. योग्य स्लॅब व वीजदरानुसार तसेच प्रत्यक्ष वीजवापरानुसारच आहे. एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड या वीजबिलामध्ये लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी कोणताही संभ्रम न ठेवता वीजबिल दुरुस्तीसाठी कार्यालयात जाऊ नये तसेच महावितरणच्या अधिकृत वीजबिल केंद्र किंवा घरबसल्या ऑनलाईनद्वारे वीजबिलाच्या रकमेचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

Thursday, June 18, 2020

शाळा सुरु करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आराखडा तयार करावा लोकनेते आ.गणेश नाईक यांची सुचना

नवी मुंबई प्रतिनिधी
टप्प्याटप्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने  घेतला आहे. मात्र त्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आराखडा तयार करावा आणि पालकांमधील संभ्रमाचे वातावरण दूर करावे, अशी सुचना लोकनेेते आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
शाळा सुरु झाल्यावर कोरोना संक्रमणाचा धोका वाढणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गात अंतर ठेवून बसण्याची सोय, स्कूल बसमध्ये प्रवास करताना सोशल डिस्टंसिंग कसे पाळणार, दररोज विद्यार्थ्यांसह शाळेत प्रवेश करणार्‍यांचे थर्मल स्क्रिनिंग करणार काय, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण किती  वेळा करणार  या सर्व उपाययोजनांचे वेळापत्रक ठरवून मुल्यमापन करणे गरजेचे असल्याचे लोकनेेते नाईक यांनी म्हंटले आहे.
दुसरीकडे शासनाने सध्या सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक त्रुटी असून ८० टक्के विद्यार्थी आणि पालक नाखुष असल्याचे लोकनेेते नाईक यांनी म्हंटले आहे. राज्यातील ग्रामिण भागातील आणि  शहरातील गरीब विद्यार्थ्यांकडे स्वतंत्र मोबाईल संच, इंटरनेट सेवा, नेटवर्क इत्यादीचा आभाव आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे कठिण बनले आहे. तासनतास मोबाईलकडे बघून विद्यार्थ्यांच्या डोळयांवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याचा धोका आहे. विशेषतः अपंग विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण जीवाला घोर असणार आहे.  
तीसरी महत्वाची बाब म्हणजे  शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१मध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे शाळांमधील सुविधांचा वापर होणार नाही. शाळांच्या खर्चाची बचत होणार असेल तर पालक-शिक्षक कमिटीच्या बैठकीत चर्चा करुन विद्यार्थ्यांना फि मध्ये सवलत देण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी शाळा या दृष्टीने चालढकल करीत आहेत, असे लोकनेते नाईक यांनी निदर्शनास आणले आहे. शाळांनी फिवाढ न करता विद्यार्थ्यांना प्रचलित फि मध्ये सवलत द्यावी आणि  शासनाच्या या संदर्भातील निर्देशांचे महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची खबरदारी शिक्षणाधिकार्‍यांनी घ्यावी, अशी मागणी लोकनेते नाईक यांनी केली आहे.

Saturday, June 13, 2020

Navi Mumbai इंडिया बुल्स येथील कोव्हिड केअर सेंटर मधून कोरोनाबाधित अथवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील 100 टक्के व्यक्ती ब-या होऊन सुखरूप परतल्या घरी

  13 मार्चला नवी मुंबईमध्ये फिलीपाईन्स प्रवाशाच्या माध्यमातून पहिला कोरोना बाधित व्यक्ती वाशीत सापडण्याच्या आधीपासूनच नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड 19 विषयी आवश्यक खबरदारी घेण्यास सुरूवात केली होती. सुरूवातीच्या काळातील कोव्हीड 19 विषयक शासकीय मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता परदेशी प्रवास करून आलेल्या प्रत्येक व्यक्तींना क्वारंटाईन करणे आवश्यक होते.

      त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने योग्य जागांचा शोध सुरू केला असता कोन, पनवेल येथील इंडिया बुल्स इमारतींमध्ये क्वारंटाईन करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचनांस अनुरूप अशा स्वतंत्र इमारती उपलब्ध असून त्यामध्ये एका व्यक्तीसाठी एक अशा पुरेशा आकारमानाच्या स्वतंत्र खोल्या व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत योग्य अशा स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध असल्याचे मा. कोकण विभागीय आयुक्त यांचेमार्फत सूचित करण्यात आले. त्यांच्या सूचनेनुसार त्यामधील इमारती नवी मुंबई महानगरपालिकेकरिता उपलब्ध करून घेण्यात आल्या.

      सुरूवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीने आमच्या विभागात कोरोनाचे विलगीकरण कक्ष नकोत अशाप्रकारे येथील नागरिकांकडून विरोध होत होता. अशावेळी कोरोनाची संसर्गातून होणारी लागण टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र खोली व स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली अत्यंत उपयोगी व्यवस्था इंडिया बुल्स येथे सहजपणे व कमी खर्चात उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे कोव्हीड 19 उपचारासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य असे मोकळे वातावरण व हवामान याची त्याठिकाणी असलेली उपलब्धता याचाही विचार करण्यात आला व इंडिया बुल्स येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले.

      हे कोव्हीड केअर सेंटर नवी मुंबई शहरापासून काहीसे दूर अंतरावर असल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेतला. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यामध्ये अधिक सुधारणांच्या दृष्टीने निर्देशही दिले. तेथील वातावरण हे लवकर बरे होण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक होते व तेथे आवश्यक सुविधा व उपचारांची सोय व्यवस्थितरित्या उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे तेथील व्यवस्थेबद्दल अनेक नागरिकांनी विविध माध्यमांतून समाधानही व्यक्त केले.

      त्याठिकाणी कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र इमारतीमध्ये व्यवस्था होती तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन करणे आवश्यक असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र इमारतीत व्यवस्था होती. ज्यामधून कोरोनाची साखळी खंडीत होण्यासाठी मदत झाली.  

      त्यामुळे इंडिया बुल्स येथे दाखल करण्यात आलेल्या 10 एप्रिलपासून ते आत्तापर्यंतच्या नागरिकांची आकडेवारी तपासली असता 799 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ब-या होऊन तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटच्या संपर्कात आलेल्या 931 क्वारंटाईन व्यक्तींपैकी 100 टक्के म्हणजेच 1730 व्यक्ती सुखरूप घरी परतल्या आहेत. त्यामुळे इंडिया बुल्स येथील कोव्हिड केअर सेंटरचा उपयोग निश्चितच चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याठिकाणी उपचार करणा-या किंवा आरोग्य सेवा पुरविणा-या एकाही डॉक्टर अथवा पॅरामेडिकल स्टाफला कोरोनाची लागण झालेली नाही.

      यापुढील पावसाळी कालावधी लक्षात घेता इंडिया बुल्स येथे कोव्हीड 19 संबंधित व्यक्तींना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यादृष्टीने तसेच सेक्टर 30 ए वाशी मध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर येथे महानगरपालिकेमार्फत सीसीसी व डिसीएचसी सुविधा असणारे कोव्हीड 19 रूग्णालय सुरू झाले असल्याने इंडिया बुल्स येथे सध्या कोव्हीड 19 संबंधित व्यक्ती न पाठविण्याचे महानगरपालिेकेने ठरविलेले आहे. तथापि त्याठिकाणी आत्तापर्यंत ठेवण्यात आलेले कोरोनाबाधित वा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या प्रकृती सुधारणेसाठी आरोग्याच्या दृष्टीने इंडिया बुल्स येथील व्यवस्था लाभदायकच ठरलेली दिसून येते. 

Wednesday, June 10, 2020

MLA Naik very Serious about COVID-19 cases in city met with NMMC Chief Annasaheb Misal


Former Minister and Airoli MLA Ganesh Naik met with NMMC Commissioner Annasaheb Misal June 10. The visit was to follow up on the most pressing issues in the backdrop of fighting the COVID-19 pandemic in Navi Mumbai. There is an absolute lax in measures and issues by the NMMC administration. Airoli MLA Ganesh Naik first met the NMMC Commissioner in his office and took up several issues that the administration seems to be overlooking in Navi Mumbai in the backdrop of COVID-19 pandemic. From the delay in making the NMMC created COVID Hospital at Vashi’s CIDCO Exhibition Ground, to the negligence against schools demanding fees, MLA Ganesh Naik demanded efforts and actions to contain the pandemic and its impact on citizens lives and health in Navi Mumbai on war footing. It is rather unfortunate that, the NMMC created COVID Hospital at Vashi’s CIDCO Exhibition Ground is being delayed for a political inauguration. Citizens lives are at stake. It’s unfortunate if some people are trying to seek political mileage from the COVID-19 pandemic in Navi Mumbai like this.